1. प्रश्र्न - मुघल साम्राज्याच्या पतनाची कारणे लिहा.
प्रस्तावना -
पानिपतच्या पहिल्या युद्धात (1526) बाबरने लोदीचा पराभव करून भारतात मुघल सत्तेची स्थापना क
े ली.
हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब असे प्रभावशाली शासक मुघल सत्तेला मिळाले. परिणामी
भारतभर मुघल साम्राज्याचा विस्तार झाला. परंतु प्रकृ तीच्या नियमानुसार उदय, वाढ व लय हा ठरलेला असतो.
त्यानुसारच औरंगजेबाच्या शासन काळापासून मुगल सत्तेच्या पतनास सुरुवात झाली व 1761 पर्यंत जवळजवळ
शेवट झाला. त्याची कारणे पुढीलप्रमाणे :
मुगल साम्राज्याच्या पतनाची कारणे :
१. औरंगजेबाचे असहिष्णू धार्मिक धोरण :
● अकबराच्या सहिष्णू व उदारमतवादी धार्मिक धोरणाने मुगलांना संघटित क
े ले तर औरंगजेबाच्या
असहिष्णू धार्मिक धोरणामुळे मुगल साम्राज्याचे विघटन झाले.
● संपूर्ण देशाला सुन्नी पंथीय इस्लाम करण्यासाठी हिंदूंना दुखावलेच नाहीतर आपले विरोधकही क
े ले.
● जिझिया कर, मंदिरांचा विध्वंस, बलपूर्वक धर्मपरिवर्तन, प्रशासनात हिंदूंना उच्च पद देणे बंद करणे असे
धोरण राबविले.
● परिणामी याविरुद्ध संपूर्ण साम्राज्यात उलट प्रतिक्रिया होऊन हिंदूंच्या व्यापक विरोधाचा सामना
मुगलांना करावा लागला.
२. औरंगजेबाचे अव्यवहारी दक्षिण धोरण
● औरंगजेबाच्या दक्षिण धोरणाने मुगल सत्तेची मुळे कमक
ु वत क
े ली. व्यवस्था खिळखिळी झाली. खजिना
रिकामा झाला. प्रशासनात अव्यवस्था निर्माण झाली.
● मराठ्यांच्या चिवट विरोधाने शेवटी मुगल साम्राज्य धुळीस मिळविले. त्याबाबत कर लिहितात मुगल
साम्राज्य साठी मराठ्यांवरील आक्रमण विनाशक सिद्ध झाले यांच्यासमोर साम्राज्याचे सक्षम व श्रेष्ठतम
साधनेही विफल ठरले.
३. औरंगजेबाचे राजपूत विरोधी धोरण
● औरंगजेबाने पूर्वजांच्या राजपूत धोरणात बदल करून राजपुतांशी असहिष्णू धार्मिक धोरणाचा स्वीकार
क
े ला.
● भारत इस्लाममय करण्यात राजपूत अडथळा ठरत असल्याने त्यांची स्वायत्तता नष्ट करून त्यांचे राज्य
मुघल साम्राज्यात विलीन करण्याचा प्रयत्न क
े ला.
● त्यामुळे राजपूतांनी दुर्गादास राठोड व अजितसिंह यांच्या नेतृत्वात औरंगजेबाविरुद्ध संघर्ष सुरू क
े ला
परिणामी मुघलांना राजपुतांचा मिळणारा पाठिंबा बंद झाला त्यामुळे मुघलांची लष्करी शक्ती क्षीण होऊन
शेवटी पतन घडून आले.
४. औरंगजेबाच्या हाती सत्तेचे क
ें द्रीकरण
● औरंगजेबने राज्याचे सर्व अधिकार व जबाबदारी आपल्याकडेच ठेवली होती. परंतु विशाल साम्राज्य व
त्याचे झालेले वय त्यामुळे त्याला साम्राज्यावर नियंत्रण ठेवता आले नाही.
2. ● औरंगजेबाची प्रांतीय सुभेदारांवरील पकड सैल झाली परिणामी सुभेदाराने क
ें द्रीय सत्तेशी संघर्ष सुरू क
े ला.
● तसेच अधिकारी वर्गही सांगकाम्या झाला होता. त्यामुळे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या
आव्हानात्मक स्थितीचा सामना निर्णय क्षमतेच्या अभावाने त्यांना करता आला नाही.
५. उत्तरकालीन मुगल सम्राट
● औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेले मुगल सम्राट प्रामुख्याने औरंगाजेबच्या संशयी धोरणामुळे
अकार्यक्षम ठरले.
● आपली मुलेही आपल्या विरुद्ध बंड करेल या भीतीने औरंगजेबाने मुलांना लष्करी व प्रशासकीय अनुभव
दिला नाही.
● त्यामुळे राज्य संचालनासाठी लागणारी कार्यक्षमता उत्तरकालीन मुगल वारसांमध्ये निर्माण झाली नाही
परिणामी मुघल साम्राज्याचे पतन त्यांना थांबविता आले नाही.
६. चारित्रहीन सरदार
● राजा तशी प्रजा या न्यायाप्रमाणे सम्राटांसारखे सरदारही दुर्बल व अकार्यक्षम ठरले.
● सुरुवातीस बहिराम खान, मुनीम खान, महाबतखान, आसफ खान यासारख्या सरदारांनी मुगल साम्राज्य
भरभराटीस आणले.
● परंतु उत्तरकालीन सरदार आळशी, विलाशी व भ्रष्टाचारी निघाल्याने त्यांच्याकडून साम्राज्याची योग्य ती
सेवा झाली नाही.
७. लष्करी पतन
● औरंगजेबाच्या काळापर्यंत अजय असलेले मुगल लष्कर पुढे दोषपूर्ण संघटन पद्धतीने कमक
ु वत झाले.
● मनसबदारी पद्धतीने लष्कराची निष्ठा सम्राटाप्रती न राहता मनसबदारांप्रति राहत असे. सैन्यासाठी
मिळणारी मनसब, मनसबदार हडप करीत असल्याने ते लष्कराची परिणामकारक कार्यक्षमता टिकवून
ठेवू शकले नाही.
● सरदारांमध्ये परस्पर द्वेष असल्याने ते एकमेकांच्या अपयशासाठी शत्रूलाही मदत करीत असे. परिणामी
लष्करी शिस्तीचा अभावामुळे पुढे साम्राज्य सांभाळणे अशक्य झाले.
८. आर्थिक पतन
● बादशाह अकबरने दूरदृष्टीचे आर्थिक धोरण राबवून मोगलांचा खजिना समृद्ध क
े ला परिणामी प्रजा सुखी
व समाधानी होती.
● पुढे मुगलांनी युद्ध आणि बांधकामांवर अतिरिक्त धन खर्च क
े ल्याने प्रजेवरील करांचे प्रमाण वाढवावे
लागले. त्यामुळे प्रजा असंतुष्ट झाली.
● पुढे औरंगजेबाने सतत युद्ध क
े ल्याने मुगलांचा खजिना पूर्ण रिकामा होऊन साम्राज्याचा आर्थिक पाया
ढासळला. धनाअभावी विशाल मुगल साम्राज्य सांभाळणे कठीण होऊ लागल्याने साम्राज्याचे पतन अटळ
ठरले.
९. दरबारातील मतभेद
● अकबराच्या काळात दरबारात एकसूत्रता होती परंतु पुढे दरबारात गटबाजी सुरू झाली.
● सुन्नी, शिया, इराणी, हिंदुस्तानी असे मुस्लिमांचे गट पडून त्यांच्यात इर्षा व द्वेष वाढू लागले त्यामुळे ते
आपापसात भांडू लागले.
3. ● सरदारांतील गटबाजीने मुगल साम्राज्यास मदत न करता उलट आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरू
क
े ला. त्यामुळे क
ें द्रीय सत्तेचे पतन होऊ लागले. आणि बंगाल, हैदराबाद, माळवा, गुजरात अशी स्वतंत्र
प्रांतीय राज्य उदयास आली.
१०. परकीय आक्रमणे
● मुगलांच्या पडत्या काळात नादिरशहा (1739) व अहमदशहा अब्दाली (1741 ते 1761) या परकीय
आक्रमकांनी भारतावर आक्रमणे करून मुगलांचा पराभव क
े ला.
● प्रचंड कत्तल करून भरमसाठ लूट मिळविली त्यामुळे मुगल सत्तेचे लष्करी व आर्थिक दिवाळे निघाले.
परिणामी ही स्थिती बघून अनेक महत्त्वाकांक्षी सरदारांनी प्रांतीय स्तरावर आपापल्या संस्थांची स्थापना
क
े ली.
११. वारसा हक्काच्या नियमाचा अभाव
● मुस्लिमांमध्ये वारसा हक्काच्या नियमाचा अभाव असल्याने बादशहाच्या मृत्युनंतर किं वा हयातीतही वाट
न बघता वारसदारांनांमधे गादीसाठी संघर्ष सुरू होत असे.
● त्या संघर्षामुळे सरदार, दरबार व लष्कराचेही गट पडून त्यांच्यात दोन दोन हात होत असल्याने मुगलांची
अतोनात लष्करी हानी होत असे.
● परिणामी लष्करीदृष्ट्या साम्राज्य पोखरले जाऊन त्यांचे पतन अटळ ठरले.